Skip to product information
1 of 1

Dada Bhagwan

आप्तवाणी-५ (Marathi)

आप्तवाणी-५ (Marathi)

Regular price Rs. 150.00
Regular price Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
आपल्या जीवनातील सर्व सांसारिक व्यवहार ‘व्यवस्थित शक्ती’द्वारे डिस्चार्ज होत आहे. आपली पाचही इंद्रिये कर्मांच्या आधीन आहेत. कर्मबंधन होण्याचे कारण काय आहे? ‘मी चंदुलाल आहे’ ही धारणाच कर्म बंधनाचे मूळ कारण आहे. फक्त सत्य (तथ्य) जाणून घेण्याचीच गरज आहे. हे एक विज्ञान आहे. या पुस्तकात पूज्य दादाश्रींनी पाच ज्ञान इंद्रिये व त्यांच्या कार्य प्रणालीबद्दल सांगितले आहे. मन-बुद्धी-चित्त-अहंकार या सर्व इंद्रियांची कार्ये वेगवेगळी आहेत. मग स्वतःचे कार्य करण्यात कोण अपयशी झाला आहे? तर ‘स्व’ अपयशी झाला आहे. जाणणे, पाहणे आणि आनंदमय स्थितीत राहणे हे ‘स्व’चे कार्य आहे. प्रत्येक मनुष्य जीवनाच्या प्रवाहासोबत पुढे वाहत जात आहे. इथे कोणीही कर्ता नाही. जर कोणी स्वतंत्र कर्ता असता तर तो नेहमीसाठी बंधनातच असता. जो नैमित्तिक कर्ता असतो तो कधीच बंधनात नसतो. संसार प्राकृतिक परिस्थितीच्या प्रभावाने उत्पन्न होणाऱ्या परिणामांवरच चालत आहे. अशा परिस्थितींमध्ये ‘मी कर्ता आहे ’ अशी चुकीची धारणा उत्पन्न होते. कर्तेपणाच्या ह्या चुकीच्या धारणेमुळे पुढील जन्माची बीजे पेरली जातात. ह्या संकलनामध्ये परम पूज्य दादाश्री कर्माचे विज्ञान, कर्तेपणा, पाच इंद्रिये, अहंकार, मनुष्यांचा स्वभाव, ज्ञानींप्रती विनय, पापांचे प्रतिक्रमण, पश्चात्ताप इत्यादी सर्व विषयांवर बोलले आहेत. ही समज साधकांना स्वतःच्या बाबतीत, व संसारातील इतर लोकांशी शांतीपूर्वक व्यवहार कशाप्रकारे करावा ह्या बाबतीत मदत करते.
View full details